satyamev jayte image
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी
महाराष्ट्र शासनाची अंगीकृत संस्था
hi
पर्यावरण व विकास केंद्र

दिनांक 29 जून 1996 रोजी यशदामध्ये पर्यावरण व विकास केंद्र स्थापन झाले व या केंद्रामुळे संस्थेमध्ये पर्यावरण व विकास या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यास सुरूवात झाली. हे केंद्र भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या तालुका, महानगरपालिका व राज्य स्तरावर प्रशिक्षण, संशोधन व प्रशासकीय विषयावरील प्रशिक्षणाचे काम पहाते.
पर्यावरण व विकास केंद्राने ग्रामिण, नागरी व सुविधा केंद्रातील अधिकारी, अशासकीय, विद्यापीठातील अध्यापक आणि अशासकीय संस्थांच्या पर्यावरणविषयक बाबी व त्यांचे नियोजन यावर प्रामुख्याने भर दिला आहे.

उद्दिष्टये -
  1. पर्यावरणीय संरक्षण, निसर्ग संरक्षण व विकास प्रशासन या विषयावरील ग्रामीण व नागरी क्षेत्रावर भर देऊन प्रशिक्षण कार्यक्रम व मोडयूलस विकसीत करणे.
  2. पर्यावरण व विकास या विषयांशी निगडीत घटकांवर शासनाच्या यशस्वी अधिका-यांना, निवडून आलेल्या प्रतिनिधींना, स्वयंसेवी संस्थांना व विद्यापीठातील अध्यापकांना सातत्यपूर्ण प्रशिक्षण देणे.
  3. पर्यावरण व विकास या विषयाशी निगडीत बाबींवर वर्गश्रेणी अधिकारी व अशासकीय संस्था यांचेसाठी संशोधन सुविधा विकसीत करणे, शिष्यवृत्ती व निवासी शिष्यवृत्ती प्रदान करणे.
  4. कृति आराखडे विकसीत करण्यासाठी चर्चेकरीता संस्था व व्यक्ती यांचेमध्ये संवाद घडवून आणण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
प्रशिक्षण कार्यक्रम

पर्यावरण व विकास केंद्रातर्फे घेतल्या जाणा-या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षण कक्षापासून ते मुख्य क्षेत्र संशोधनापर्यंत आधारित कार्यक्रम असा प्रवास असतो. यामध्ये भागीदारांचा सहभाग आणि विकास प्रशासनावर आधारित नैसर्गिक साधनांची ओळख करून देणे याचाही समावेश असतो. सन 1996 ते 2018 या कालावधीत संस्थेमार्फत केंद्राने 1,325 पेक्षा जास्त प्रशिक्षण कार्यक्रम, सेमिनार व कार्यशाळा घेतल्या आहेत. 40,000 पेक्षा जास्त अधिकारी व इतर प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.
पर्यावरण व विकास केंद्रातर्फे विस्तृत कार्यक्रम हाती घेण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग या विभागांकरिता घेण्यात आलेल्या विभागनिहाय कार्यक्रमांचा समावेश होता व हे कार्यक्रम यशस्वीरित्या अनेक वेळा आयोजित करण्यात आले. पर्यावरण व विकास केंद्रातर्फे घेण्यात आलेले कार्यक्रम पुरस्कृत होते व कार्यक्रमाविषयी प्रशंसाही करण्यात आली. विविध कार्यशाळांच्या आयोजनातून राजस्थान, झारखंड, मणिपूर व हिमाचल प्रदेश या राज्यांची क्षमतावृध्दी करण्यात आली.

प्रकल्प
  • महाराष्ट्र राज्य जैवविविधता धोरण व कृति आराखडा
  • उल्हासनगर महानगरपालिकेकरिता पर्यावरणीय सद्यस्थिती अहवाल
  • भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित पर्यावरणीय सद्यस्थिती अहवाल
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकरिता भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित मोजणी
  • शिवरी गाव, पुरंदर तालुका, जिल्हा पुणे आणि कवठेपिराण, तालुका व जिल्हा सांगली या गावांतील नैसर्गिक साधनांची भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित मोजणी
  • मिहान (नागपूर) प्रकल्पाशी निगडीत मायग्रेटरी बर्डस फ्लायवेज
  • बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशिक्षण गरजांचे विश्लेषण
  • बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम प्रशिक्षण गरजांचे विश्लेषण

महाराष्ट्र शासनांतर्गत संपूर्ण स्वच्छता अभियानाद्वारे गावपातळीवरील क्षमतावृद्धीच्या उपक्रमास हातभार लावल्याबद्दल संस्थेस सन्मानित करण्यात आले.